Apurva Kulkarni
वारकरी संप्रदायाची ही जुनी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात.
1820 च्या आसपास हैबतराव आरफळकर या सरदाराने ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी पालखी सुरू केली. ते शिंदे दरबारात होते, पण भक्तीमुळे वारकरी झाले.
तुकाराम महाराजांच्या कुटुंबात मानपानावरून थोडा वाद झाला. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र पालखी सुरू करावी लागली.
या पालखी सोहळ्याला शिंदे दरबाराकडून मदत मिळाली. त्यांच्या जावयाने, शितोळे यांनी ज्ञानेश्वरांच्या पालखीला पुढे नेले.
प्रत्येक दिंडीला क्रमांक, वेळ आणि प्रमुख असतो. नियम खूप कडक असतात. हा क्रम 1934 मध्ये ठरवला गेला.
पालखीत संत-पादुका असतात. त्यांच्या मागे 103 अधिकृत दिंड्या आणि मग इतर दिंड्या चालतात. हा सोहळा खूप योजनाबद्ध असतो.
वादानंतर दोन्ही पालख्यांचे सोहळे वेगळे झाले. तरीही, वारीतील त्यांची गळाभेट एक खास क्षण असतो.
काही दिंडी फड ज्ञानेश्वरांच्या, तर काही तुकाराम महाराजांच्या पालखीत सामील झाले. उदा. आजरेकरांचा फड.
वारी म्हणजे फक्त चालणे नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. टाळ-मृदंगाच्या आवाजाने भक्तीमय वातावरण तयार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.