सकाळ वृत्तसेवा
26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देण्याचा पहिला आदेश निघाला.
हा आदेश म्हणजे भारताच्या इतिहासातील आरक्षणासंबंधीचा पहिला अधिकृत जाहीरनामा ठरला.
महाराजांनी पाहिलं की मागासवर्गीयांपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हतं. त्यामुळे नोकरीत आरक्षणाची गरज भासली.
"रिकाम्या झालेल्या जागांपैकी 50% जागा मागासलेल्या लोकांस भराव्या," असा आदेश देण्यात आला.
जास्तीत जास्त मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेऊन नोकऱ्यांमध्ये यावं, यासाठी आरक्षण लागू करण्यात आलं.
जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं की ब्राह्मण, परभू, शेणवी, पारशी व पुढे गेलेले वर्ण वगळता सर्वजण मागासवर्गीय.
नवीन नेमणुकीचं तिमाही पत्रक प्रत्येक खात्याने सरकारला पाठवणं बंधनकारक होतं.
‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन आणि कार्य’ या पुस्तकात या जाहीरनाम्याचा तपशीलवार उल्लेख आहे.
हा निर्णय म्हणजे भारतात सामाजिक न्यायाची पायाभरणी करणारा ऐतिहासिक टप्पा होता.
शाहू महाराजांचं हे धोरण आजही आरक्षणाच्या लढाईसाठी दिशा दाखवतं आणि सामाजिक समतेचं प्रतीक ठरतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.