Yashwant Kshirsagar
शेतकऱ्याचे हित हेच शिवरायांच्या स्वराज्याचे ध्येय होते. शिवरायांच्या शेती, शेतकरीविषयक असणार्या या उत्तम धोरणामुळे शेतकर्यांवर कधी आत्महत्या करण्याची वेळ आली नाही.
शिवरायांनी शेतीचे जास्तीत जास्त क्षेत्र बागायती व्हावे यासाठी नेमकं काय करता येईल याची निजोयन केले. शेती बागायती झाली तर स्वराज्यात उत्पन्न वाढेल आणि रयत उपाशी राहणार नाही हे त्यांनी जाणले होते.
यामुळे त्यावेळी लागवडीखाली जास्तीत जास्त जमीन आणण्याकरिता उत्तेजन दिले जात असे. लागवडीखाली येणाऱ्या जमिनीत बागायती पिके तसेच भातशेती होई.
ऊस, आले, हळद आणि भाज्या यांच्या लागवडीकरिता वर्षभर पाणी लागते हे पाणी विहिरी आणि कालवे किंवा पाटबंधारे यातून मिळत असे.
शिवाजी महाराज शिवापुरास आल्यावर त्याना आमराई तयार करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी पाण्यासाठी कालवा खणण्याचे काम हाती घेतले.
जे कोणी पुढाकार घेऊन पाटबंधारा बांधून ते पाणी शेतीसाठी वापर असे त्यास शिवाजी महाराज शेतजमीन इनाम देत असत. वाई परगण्यांतील गोवा गावी कालव्याचे पाणी शेतीसाठी वापरले जाई.
सरकारातून दिनांक १५ फेब्रुवारी १६५० ला अशी आज्ञा केली गेली की, शेतीसाठी कालव्याचे पाणी दर आठ दिवसांनी एकदाच वापरावे.
कालव्याच्या पाण्याचा वापर शासनाच्या अखत्यारीत आला. पिकांसाठी कालव्याच्या पाण्याचा वापर कसा करावयाचा ह्यासंबंधी शासकीय हुकूम त्यावेळी निघाला होता.
केळीच्या बागांना कालव्याचे पाणी मिळत असल्यास एका बिघ्याच्या लागवडीस ३ होन व २ होन आकार घेतला जाई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.