Shubham Banubakode
'भाकरी फिरवली पाहिजे' हे वाक्य राजकारणापासून समाजकारणापर्यंत सगळीकडे वापरलं जातं.
भाकरी करण्याची प्रक्रिया बहुतेकांना ठाऊक असेल. सामान्यत: लोखंडी तव्यावर भाकरी केली जाते.
भाकरी थापल्यानंतर तव्यावर ती सारखी फिरवत बसावी लागते. असे केले तर आपोआपच ती सर्व बाजूंनी समानच भाजली जाते.
भाकरी अशा पद्धतीनं केली तर ती खाण्यास रुचकर आणि पचनालाही हलकी होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात 'भाकरी फिरवणे' हा वाक्प्रचार लोकप्रिय आहे. पण प्रत्यक्ष भाकरीचा अन् राजकारणाचा काय संबंध?
'भाकरी फिरवणे' या वाक्प्रचाराचा राजकीय क्षेत्रातील अर्थ म्हणजे राजकीय पक्षातील सर्वांना योग्य वेळी व समान संधी देणे.
राजकीय पक्षात वेळेत भाकरी फिरवली तर पक्षात काही काळाने असंतोष वाढीस लागत नाही व बंडखोरी होत नाही.
ज्या पक्षात लोकशाही तत्त्वे पाळली जातात तेथे सर्वांना आपोआपच समान संधी मिळते. पण घराणेशाही किंवा हुकूमशाही असेल तेव्हा असंतोष वाढून भाकरी करपते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.