Sandip Kapde
सातारा शहराची स्थापना छत्रपती थोरले शाहू महाराजांनी केली.
शाहू महाराजांनी अजिंक्यताऱ्यावर आपला राज्याभिषेक करवून घेतला.
त्यांनी किल्ल्यावरूनच राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.
सातारा हे शहर नसून पूर्वी एक महत्त्वाचा किल्ला होता.
हा किल्ला मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो.
२७ जुलै १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून 'आझिमतारा' ठेवले.
औरंगजेब अनेक वास्तूंची नावे बदलत होता.
ताराराणींनी किल्ल्याचे नाव बदलून 'अजिंक्यतारा' असे ठेवले.
मराठा साम्राज्याचा विस्तार होऊ लागल्याने सातारच्या किल्ल्याचा परिसर कमी पडू लागला.
सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली. मराठा साम्राज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणत शाहू महाराजांनी सातारच्या किल्ल्याभोवती शहर वसवले.
१७२१ साली शाहू महाराजांनी 'शाहूनगर' या नावाने शहराची स्थापना केली, जे आजचे सातारा म्हणून ओळखले जाते.
शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.