Sandip Kapde
दुष्काळाच्या काळात शिवाजीराजे शेतकऱ्यांना बैलजोडी आणि धान्य देत असत.
वाढीदिडीने कर्ज वसूल करू नका, असे शिवाजीराजांनी स्पष्टपणे सांगितले.
गरिबांचे शोषण करणाऱ्या व्याज पद्धतीला त्यांनी आळा घातला.
शिवाजी महाराज संकटसमयी श्रमकरी आणि कष्टकरी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
त्यांच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत.
मोगल फौजेच्या आक्रमणाच्या वेळी रयतेला सुरक्षितता देण्याचा आदेश दिला.
रयतेला सुरक्षितस्थळी पाठवण्याची जबाबदारी सर्जेराव जेधे यांना देण्यात आली.
संकटसमयी रयतेला मदत करणे हे खरे पुण्य आहे, असे शिवाजीराजे मानत.
रयतेची काळजी न घेतल्यास त्याचे पाप अधिकाऱ्यांच्या मस्तकी बसेल, असे त्यांनी बजावले.
शिवाजी महाराजांनी समाजहितासाठी तिजोरीवर बोजा पडू दिला.
त्यांनी मानवी मूल्यांना प्रथम प्राधान्य दिले.
संकटाच्या वेळी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणत.
शिवाजीराजांनी प्रजेला रक्षण देणारे राज्यकर्ते होण्याचा आदर्श घालून दिला.
त्यांची राज्यव्यवस्था न्याय आणि मानवतेच्या तत्त्वांवर आधारलेली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देत असत. (२०२२ मध्ये सकाळमध्ये ज्येष्ठ लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेली ही माहिती आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.