Pranali Kodre
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. पण वनडेत सध्या सक्रिय आहेत.
मात्र आता दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार कदाचित ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका त्यांची अखेरची वनडे मालिका असू शकते.
दरम्यान, बीसीसीआय या दोघांना भारतातील वनडेची देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळण्यास सांगण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे ते वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत कायम राहतील.
दरम्यान गेली अनेक वर्षे हे दोघे विजय हजारे ट्रॉफी खेळलेले नाहीत.
विराट विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १८ फेब्रुवारी २०१० रोजी दिल्लीकडून अखेरचा खेळला होता. त्यावेळी तो दिल्लीचा कर्णधार होता. त्याने सेनादलाविरुद्ध हा सामना खेळताना १६ धावा केल्या होत्या.
रोहित शर्मा २०१८ मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत मुंबईकडून खेळला होता. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात बिहारविरुद्ध नाबाद ३३ धावा आणि उपांत्य सामन्यात हैदराबादविरुद्ध १७ धावा केल्या होत्या.
म्हणजेच विराट तब्बल १५ वर्षे, तर रोहित ७ वर्षांपासून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.