Shubham Banubakode
पूर्वी एखाद्या गावाबाहेर चिंचेचं झाड असलेलं आपण अनेकदा बघितलं आहे. पण त्याचं कारण तुम्हाला माहिती का?
याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
मारुती चितमपल्ली यांच्या मते, चिंचेच्या झाडात विलक्षण अर्थिंग क्षमता असते. ही क्षमता विजेच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
पावसाळ्यात गावात विजा पडण्याचा धोका असतो. गावाभोवती चिंचेची झाडं लावल्यास ती विजेचा प्रवाह जमिनीत उतरवतात, ज्यामुळे गावकऱ्यांचं आणि घरांचं रक्षण होतं.
चिंचेच्या झाडाची मुळे खोलवर जातात आणि त्यात विजेचं वहन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. यामुळे वीज खेचली जाऊन जमिनीत मिसळते, ज्याने नुकसान टळतं.
चितमपल्ली सांगतात की, वादळात चिंचेच्या झाडाखाली उभं राहू नये. कारण झाड विजेला आकर्षित करतं आणि ती जमिनीत घेऊन जातं,
चिंचेची झाडं केवळ विजेपासूनच नाही, तर पर्यावरणालाही लाभ देतात. त्यांची सावली, फळं आणि लाकूड गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतं.
गावकऱ्यांनी चिंचेची झाडं लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी, असं चितमपल्ली आवर्जून सांगायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.