बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
Published on

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना

अलिबाग, ता. १६ : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी व बालकल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. उपायुक्त (बालविकास) यांनी ‘जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये,’ असे स्पष्ट निर्देश दिले.
धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स व पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवली जाणार असून ग्रामीण व आदिवासी भागात अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ व मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास पालकांसह विवाह लावणारे व उपस्थितांवर गुन्हा दाखल होऊन एक लाख दंड व दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com