

Political Tug-of-War: Rajeev Patil’s Stand Sparks Debate Between BVA and BJP
Sakal
विरार : वांद्रे परिसरातील बेकायदा बांधकामांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत अनेक घरे जमीनदोस्त करण्यात आली असून यामुळे बेघर झालेल्या विस्थापितांचा लोंढा वसई-विरारमध्ये स्थायिक होणार असल्याच्या चर्चा आता समाजमाध्यमांतून रंगू लागल्या आहेत. वांद्रे येथील बेघरांचे लोंढे वसई-विरार भागात स्थलांतरीत झाल्यास शहरातील बेकायदा बांधकाम वेगाने फोफावेल अशीही भीती व्यक्त केली जात असताना आता माजी महापौर राजीव पाटील यांच्या वक्तव्यामुळे या विषयाने नवे वळण घेतले आहे.