

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या मालिका प्रेक्षकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. आपली आवडत्या मालिकेत काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात. मालिकेचा ट्रॅक चांगला असेल तर कौतुक करतात आणि ट्रॅक वेगळ्या दिशेला गेला की त्यावर टीकाही करतात. अशाच एका मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सध्या टीआरपी यादीत पहिल्या पाच मध्ये आहे. आता मालिकेत जानकी ऐश्वर्या बनून नानांच्या किडनॅपिंग मागचा खरा सूत्रधार शोधणार आहे.