पिंपरी परिसरातील शेतमजुरांवर उपसमारीची वेळ
नीरा नरसिंहपूर, ता.३१ : नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेती, शेतकरी व शेतमजूरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीत चिखल झाला असून वाफसाच नसल्याने शेतकऱ्यांना काम करता येत नाही तर शेतमजूरांच्या हाताला कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे अनं खायचे काय असा सवाल पिंपरी बुद्रुक येथील मंगल कांबळे यांनी केला आहे.
गणेशवाडी येथील शेतकरी तुकाराम घोगरे यांची मका, अंकुश शिंदे यांची बाजरीचे पीक शेतात पावसाचे पाणी साचल्याने काढता येत नसल्याने सडू लागली आहे. तसेच पिंपरी बुद्रुक येथील केशव बोडके यांच्या डाळिंब पाण्यात असल्याने नुकसानीला तोंड देण्याची वेळ आली आहे.
शिंदेवस्ती येथील अशोक शिंदे, धोत्रेवस्ती येथील पांडुरंग गायकवाड, गणेशवाडी येथील तुकाराम घोगरे यांच्या विहीर अवकाळी पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तर पिंपरी बुद्रुक, गिरवी, टणू, नरसिंहपूर, गोंदी, ओझरे येथील अनेक बोअरवेल, विहिरीची पाणी पातळी वाढल्याने वरून पाणी वाहू लागले आहे.
शासनाने नुकसान झालेल्या पिके, शेती, घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असतानाही शासकीय यंत्रणा अद्याप नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.