Akola Railway : मध्य रेल्वेची माना ते मूर्तिजापूर वाहतूक नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुर्ववत

पावसाने गेला होता रुळ वाहून; पहाटे २ वाजताच्या सुमारास सुरळीत झाली
central Railway Mana to Murtijapur service resumed after nine hours rain akola
central Railway Mana to Murtijapur service resumed after nine hours rain akola sakal
Updated on

माना/मूर्तिजापूर (जि.अकोला) : जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान जितापूरजवळ मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा मार्गावरील रुळाखालील भराव पावसाच्या पाण्याने सोमवारी वाहून गेला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रीतूनच अथक परिश्रम करीत अवघ्या नऊ तासात पुन्हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही कडील वाहतूक पहाटे २ वाजताच्या सुमारास सुरळीत झाली.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील जितापूर जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या ठिकाणा भुयारी मार्गाचे काम देखील सुरू आहे.

साचलेले पाणी रुळाखालून वाहून गेले. त्या पाण्यासोबत गिट्टीदेखील वाहून गेल्याने रुळाचा काही भाग हा अधांतरी झाला होता. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक थांबवण्यात आली होती.

central Railway Mana to Murtijapur service resumed after nine hours rain akola
MANA Railway Station : रेल्वे रुळाखालील भराव गेला वाहून; 4 ते 5 फूट खड्डा; दोन्ही बाजूंच्या गाड्यांना 7 तासांचा विलंब

त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. दुरुस्तीचे कार्य सोमवारी रात्री ८.३० वाजतापासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे कार्य सुरू होते. पहाटे २ वाजताच्या सुमारास हे काम पूर्ण झाले. त्यानंतर धिम्या गतीने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. पहाटेपर्यंत दोन्ही कडील मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

central Railway Mana to Murtijapur service resumed after nine hours rain akola
Akola News : रिक्त पदे, डॉक्टरांच्या बदलीमुळे नेत्ररोग विभाग अडचणीत! विद्यार्थ्यांची गैरसोय

चार ते पाच तास उशिरा धावल्यात गाड्या

अकोला जिल्ह्यात रुळाखालील भराव वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही कडील काही गाड्यांचा मार्ग वळविण्यात आला होता तर काही गाड्या भुसावळ, बडनेरा व नागपूर येथे थांबविण्यात आल्या होत्या. भुसावळकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या सुमारे एक ते दोन तास उशीरा धावत आहेत तर नागपूरकडून भुसावळकडे धावणाऱ्या गाड्यांना चार ते पाच तास विलंब झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.