

Elephant Swept Away in Assam Flood Rescued After 100 Km Journey
Esakal
आसाममध्ये पावसानं थेमान घातलं असून महापुरानं हाहाकार उडाला आहे. महापुरानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ६० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुराचा फटका वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. पुरात नागालँडच्या पर्वतांमधून वाहून एक पाळीव हत्ती आसामपर्यंत पोहोचला. वनविभागाच्या पथकाने वेळेत बचावकार्य राबवत हत्तीला बाहेर काढलं. आता त्या हत्तीवर उपचार केले जात आहेत. Assam Floods Elephant Rescued After Drifting 100 Km