

नवी दिल्ली : ‘‘अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना परत पाठविले जाण्याची प्रक्रिया नवी नसून ती अनेक वर्षांपासून चालत आली आहे. विदेशात अवैध राहणाऱ्या नागरिकांना स्वीकारणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे,’’ असे स्पष्टीकरण आज राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले.