राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय; मार्च नंतर निच्चांकी संख्येची नोंद

1553 नवे रुग्ण; 26 रुग्णांचा मृत्यू 
covid 19
covid 19Team eSakal

मुंबई: दुसऱ्या लाटे नंतरची सर्वात कमी बाधित रुग्णसंख्येची नोंद आज झाली. आज 1553 बाधित रुग्णांची नोंद झाली असून मार्च नंतरची ही निच्चांकी नोंद आहे. राज्यात मृतांचा आकडा नियंत्रणात आला असून आज 26 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,760 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29,627 इतकी आहे.

आज 1553 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,89,982 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 1682 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,16,998 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.38 % एवढे झाले आहे.

covid 19
चांगला माणूस होईन, NCB ला अभिमान वाटेल; समुपदेशनात आर्यनचे वचन

नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5, नाशिक 4, पुणे 10, कोल्हापूर 1, लातूर 6 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,34,807 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,027 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com