'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'

बंडखोर आमदारांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे.
shiv sena leader arvind sawant
shiv sena leader arvind sawant esakal

मुंबई : महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, की जेव्हा बेरोजगारी आणि महागाई असताना, तर काही लोकांना केवळ सत्तेत येण्याची चिंता आहे. शिवसेना प्रमुखांशिवाय त्यांचे (बंडखोर आमदार) अस्तित्वच राहू शकत नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही, अशी घणाघाती टीका खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर केली. (Maharashtra Politics Arvind Sawant Says In State Unemployment, Inflation But Some Want Power)

shiv sena leader arvind sawant
शिंदे गटाचे नरेश म्हस्के आक्रमक, शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

मुंबईत (Mumbai) ते शनिवारी (ता.२५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले त्यातील (बंडखोर आमदार) काही जणांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना इतके दूर आसाममध्ये घेऊन जाण्यात आले आहे. अनेक आमदार आम्हाला सांगत आहेत, की त्यांना परत येण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

shiv sena leader arvind sawant
देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईबाहेर; तर शिंदे गटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. पक्षातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. पाच पैकी ही दोन महत्त्वाचे ठराव मानले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com