

Latur News
esakal
लातूर: प्रमुख रस्त्यावर असलेली पार्किंगची असुविधा, भर रस्त्यात तासन्तास उभी राहणारी वाहने, रस्त्यावर वाढत चालेली अतिक्रमणे या कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने शहरातील प्रमुख चौकांचा श्वास गुदमरत आहे. मात्र, वाहतूक पोलिस, महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार’, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.