

Latur News
esakal
लातूर: गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याची पातळी घटत असून पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेवाळ निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होत असून असे पाणी शुद्धीकरणावेळी क्लोरीनच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, शेवाळनिर्मित पाण्याचा पुरवठा कमी झाला असल्याने पाण्याचा रंग सध्या पूर्ववत झाल्याचे चित्र शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर मंगळवारी (ता. सात) पाहायला मिळाले.