

Beed News
esakal
शिरूर कासार: शिरूर कासार रणरणते ऊन अंगाची लाहीलाही करत असताना, माणसांप्रमाणेच जंगलातील मुक्या जिवांचीही पाण्यासाठी कासावीस होते. नैसर्गिक ओढे, तलाव आणि जलस्रोत कोरडे पडल्याने पाखरांचे थवे आणि वन्यप्राणी गावकुसाकडे धाव घेऊ लागले होते.
मात्र, शिरूर कासार तालुक्यातील वन विभागाने निसर्गधर्माचे पालन करत जंगलातच पाण्याची सोय केली आहे. दुर्गम डोंगरदऱ्यात वन विभागाचे टँकर पोहोचू लागल्याने, पाण्यासाठी होणारी वन्यजीवांची जीवघेणी भटकंती आता थांबली असून, सुमारे पाच हजार वन्यजीवांना या कृत्रिम पाणवठ्यांनी मोठा आधार दिला आहे.