BSNL network problem in Sangli villages
esakal
सांगली : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या टप्प्यावर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५६ गावांमध्ये ‘बीएसएनएल’ची सेवा जवळपास ‘नॉट रिचेबल’ झाली (Sangli rural internet connectivity problem) आहे. ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’अंतर्गत ५३८ गावांपर्यंत ‘फायबर कनेक्टिव्हिटी’ पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले, तरी आतापर्यंत केवळ ८२ गावांपर्यंतच ही सेवा पोहोचली आहे. उर्वरित गावांपर्यंत ती कधी पोहोचणार, याबाबतही अनिश्चितता आहे. सरकारने ‘बीएसएनएल’कडे सापत्नभावाने पाहून खासगी कंपन्यांना रान मोकळे करून दिल्याचा आरोप होत असून, ‘कनेक्टिंग इंडिया’चा नारा देणाऱ्या या सार्वजनिक कंपनीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.