

Akola
esakal
मूर्तिजापूर: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांना धुरापासून मुक्ती मिळाली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती आणि ग्रामीण भागातील सिलिंडर टंचाईमुळे अनेक लाभार्थी महिलांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र तालुक्यातील विविध गावांमध्ये दिसून येत आहे. वाढत्या खर्चामुळे आणि वेळेवर सिलिंडर उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.