ब्रेकिंग : रत्नागिरीच्या भगवती बंदरात अजस्त्र लाटांमध्ये भरकटले जहाज 

cyclone nisarga ship stuck high waves ratnagiri sgy
cyclone nisarga ship stuck high waves ratnagiri sgy

रत्नागिरी : वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात सापडलेले बार्ज अखेर पांढरा समुद्र येथील धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या बार्ज मध्ये 13 खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लाटांच्या तडाख्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्यानजिक नांगरून ठेवलेले बार्ज सापडले. वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात बार्ज भरकटले होते. वादळासोबत समुद्राला आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे. या तडाख्यात एक बार्ज सापडले. हे बार्ज भगवती बंदर येथे नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने बार्ज भरकटले. भगवती बंदर येथून भरकटलेले जहाज लाटांच्या तडाख्याने पांढरा समुद्र किनाऱ्यानजिक पोचले. समुद्राच्या भरतीसोबत हे बार्ज जाऊन किनाऱ्यावर उभारलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर जाऊन आढळले. सुदैवाने यात बार्जचे नुकसान झाले नसून बार्जसह खलाशांच्या बचावासाठी काम सुरू आहे.

वादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली, गुहागर या किनारी भागांना बसू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, त्या तुलनेत रत्नागिरी आणि राजापूरच्या किनारी भागाला कमी फटका बसेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वेळास या किनारी भागातील सुमारे १२००, दापोलीतील २३५, तर गुहागरमधील ११९६ लोकांचे स्थलांतर केले आहे. दापोली तालुक्यातील २३ गावे किनाऱ्यावर असून त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com