Manipur Violence : महिलांवर अत्याचार होत असेल, तर भाजप सरकार तातडीनं कारवाई करतं; चित्रा वाघांचा विरोधकांवर निशाणा

'विरोधकांना महिलांच्या कोणत्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे नाही'
Chitra Wagh Manipur violence
Chitra Wagh Manipur violenceesakal
Summary

'मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत, की महिला व मुलींच्या सुरक्षिततेचे कायदे अधिक कडक करा.'

कऱ्हाड : मणिपूरसारख्या (Manipur Violence) संवेदनशील मुद्द्यावर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा विरोधकांना चर्चेचे निमंत्रण दिले. मात्र, चर्चेसाठी कोणी आले नाही. केवळ कांगावा करत राहिले. त्यामुळे त्यांना महिलांच्या कोणत्या प्रश्नाबाबत काही देणेघेणे नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

भाजपशासित प्रदेशाबद्दल बोलायचे, सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. पश्चिम बंगाल, राजस्थानच्या घटनेबाबत त्यांना विसर पडतोय. आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, हेच त्यांच्याकडून पाहिले जात आहे, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विरोधी पक्षांवर केली.

Chitra Wagh Manipur violence
Ashok Chavan : भाजप नेते म्हणतात आम्ही भिडेंच्या मताशी सहमत नाही, मग कारवाई का करत नाही? अशोक चव्हाणांचा थेट सवाल

महिलांवर अत्याचार होत असले, तरीही आमचे सरकार तातडीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विविध कार्यक्रमांसाठी वाघ आज कऱ्हाड दौऱ्यावर होत्या. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.

Chitra Wagh Manipur violence
Ashok Chavan : 'वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच चांगली'; अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार?

वाघ म्हणाल्या, ‘‘मणिपूर भारताचा हिस्सा आहे. मणिपूरमध्ये यापूर्वी कोणतेही पंतप्रधान गेलेले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गेले आहेत. त्या नॉर्थ इस्टला भारताशी कनेक्ट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेकदा मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना पत्र दिले आहे. तरीसुद्धा ते आले नाहीत.

Chitra Wagh Manipur violence
Shivendraraje Bhosale : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला वेगळाच संशय

त्यांनी केवळ मीडियावर चर्चा केल्या. मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत, की महिला व मुलींच्या सुरक्षिततेचे कायदे अधिक कडक करा. लवकरच तो कायदा होणार आहे.’’ खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत. ते १०३ दिवस जेलमध्ये होते. एखादी व्यक्ती जेलमध्ये गेल्यावर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तसा परिणाम त्यांच्यावर झाला आहे, असा टोला चित्रा वाघ यांनी खासदार राऊत यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com