Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदारांनी अडवलेला टँकर गावात!; ग्रामस्थ आनंदीत; तहानलेल्या चिंचवनवासीयांची वणवण आता थांबणार

Delay by Tehsildar Sparks Frustration: चिंचवनसह सहा गावांना महिनाभरापासून पाणी टंचाईची समस्या होती. तहसीलदारांच्या उशीरामुळे टँकर येण्यास विलंब झाला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: तालुक्यातील चिंचवन येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांवर वणवण करण्याची वेळ आली. एवढेच नाही, तर काहीजण जनावरांच्या हौदातील पाणी चोरून-लपून आणत आहेत. असे असताना या गावासह सहा गावांतील टँकरच्या प्रस्तावावर तहसीलदारांनी शनिवारपर्यंत (ता. ११) सही केली नव्हती. याबाबत

‘सकाळ’ने रविवारी (ता. १२) वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत प्रस्तावाच्या मंजुरीची वाट न बघता गटविकास अधिकाऱ्यांनी चिंचवन येथे टँकर पाठवला. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com