

Jayakwadi Dam
esakal
छत्रपती संभाजीनगर: नाशिकमध्ये या हंगामात दुसऱ्यांदा आलेला मोठा पूर, नांदूर मधमेश्वर धरणातून पुन्हा सुरू झालेल्या मोठ्या विसर्गामुळे मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. हे पाणी आता जायकवाडी प्रकल्पात येईल आणि ३१ टक्क्यांवर स्थिर असलेल्या या धरणाची पातळी वाढेल. दरम्यान, मराठवाड्यात पावसाने आज हुलकावणी दिली. केवळ छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागांत तुरळक हजेरी होती.