Eknath Shinde
sakal
ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पाच्या खोदकामातून निघणारी माती शक्यतो भूमिगत मार्गानेच वाहून नेली जाईल, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले असून, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.