नाशिक- राज्य शासनाने सुधारित वाळू धोरण-२०२५ आखताना पूर्वीप्रमाणे लिलाव पद्धतीने वाळूचे ठेके देण्याचा निर्णय घेतला आहे. पण गेल्या काही वर्षांत शासनाने वाळूबद्दल सातत्याने बदलती भूमिका घेतली असून, त्याचा थेट फटका स्थानिक पातळीवर बसतो आहे. नाशिकमध्ये दीड वर्षाहून अधिक काळापासून ५२ वाळूघाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यातच पुन्हा एकदा शासनाने नवीन धोरणाचा घाट घातला गेला असून, ते किती प्रभावी ठरणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.