

Farmers in Goda-Pravara Belt in Distress as Hailstorm Ravages Standing Crops
sakal
श्रीरामपूर : तालुक्यातील गोदा व प्रवरा पट्ट्यात रविवारी (ता. ३१) सायंकाळी वादळासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. कांदा, भाजीपाला, डाळिंब तसेच अन्य पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.