Ratnagiri Mumbai Goa Highway accident
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटात आज सकाळी भीषण अपघात (Ratnagiri Mumbai Goa Highway accident) झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर आदळला. या अपघातात ट्रेलरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर होऊन चालक आतमध्ये अडकल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती. लांजा पोलिसांनी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने जिवाची बाजी लावत बचावमोहीम राबवून चालकाचा जीव वाचवला.