

हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झालीय, ती आमची लाडकी बहीण असल्याचं म्हणणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी युटर्न घेतलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी केलेले प्रयत्न सर्वांनाच माहितीयत. मी मराठीचा सर्वाधिक सन्मान केला असल्याचं प्रताप सरनाईक म्हणालेत. हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं निर्माण झालेल्या वादानंतर सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलंय. पत्रकारांनी नको त्या बातम्या पेरल्या असं म्हणत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव मंत्री सरनाईक यांनी केली.