Maharashtra Heavy Rain Alert:
esakal
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, पुणे, नाशिक घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.