स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

मुंबई ः गेले काही आठवडे स्थलांतरीत मजूर मुंबईतून गावी परत जाण्यासाठी किती कष्ट करीत आहेत, हे नजरेस येत होते, पण आता त्यातील काहींनी आपल्या मालकांना नोकरीवर परत येण्याबाबत फोन करण्यास सुरुवात केली आहे, एवढेच नव्हे तर काहींनी मुंबईत परतण्याची व्यवस्था करण्यासाठी साकडे घातले आहे.

संजय साहू हा सोन्याच्या पिढीवर काम करणारा दोन आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालला गेला होता. आपल्या गावाकडच्या घराची चिंता वाटत असल्याचे त्याने सांगितले होते, असे भाईंदरमधील सोने विक्रेत्यांनी सांगितले. लक्ष्मीधर साहू याने हा आपल्या मालकांकडून दहा हजार रुपये घेऊन पश्चिम बंगालमधील घरी परतला. आता त्याचे पैसे संपले आहेत. त्याने आपल्या मालकाकडून दोन हजार रुपये मागितले आहेत. त्यानेही परतण्याची तयारी केली आहे. 
केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर उत्तर प्रदेशात गेलेले स्थलांतरीतही परतण्यास उत्सुक आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गावाला गेलो, पण पोट्यापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. असे मुंबईत बांधकाम कामगार असलेल्या उमेश पांडेने सांगितले. त्याने आपल्या मालकांना हजार रुपये आगाऊ देण्यास सांगितले आहे. मला कामावर यायचे आहे. माझ्याकडचे पैसे पूर्ण संपले आहेत, असे त्याने सांगितले.

अनेक दुकानदारांनी आपल्या कामगारांशी संपर्क साधल्याचे समजते. त्यांनी परत यावे यासाठी परतीच्या प्रवासाचे पैसेही देण्याची तयारी दाखवली आहे. काहींनी तर आगाऊ मानधनही देण्याची तयारी दाखवली आहे. नव्याने येणाऱ्या कामगारांना काम शिकवण्याऐवजी जुनेच परतलेले चांगले अशीच त्यांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com