

Kolhapur uttur Accident News
esakal
Family Killed in Uttur Ghat : (अजित माद्याळे) : सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बहीण शोभाचा फोन आला. आम्ही सर्व जण गावातून निघालोय. पावसामुळे उत्तूरमध्ये थांबलोय. पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही हळू येतो. तू व वहिणी गडहिंग्लजमध्येच थांबा. आम्ही आल्यानंतर सर्व जण मिळून गावी जाऊ, असे सांगून बहिणीने फोन ठेवला अन् ते सर्व जण आलेच नाहीत. अश्रूंच्या धारा सांभाळात ओथंबलेल्या डोळ्यांनी त्यांची चातकासारखी वाट पाहणारे मृत शोभाचे भाऊ राजेंद्र गवळी हे काळीज चिरणारा हा संवाद सांगत होते.