

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेजिस्टंस फ्रंटने घेतली होती. मात्र आता टीआरएफने आम्ही हल्ला केलाच नाही असं म्हणत युटर्न घेतलाय. हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केली गेली ते अनधिकृत होतं. त्याचा तपास आम्ही करत आहोत. आम्ही हल्ला केलाय अशी पोस्ट आमच्या प्लॅटफॉर्मवरून केली गेली यामागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा दावाही टीआरएफनं केलाय.