

India vs England 1st ODI: भारत विरुद्ध इंग्लंड संघाच वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये गुरुवारी (६ फेब्रुवारी) पार पडला, ज्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात फलंदाजांपैकी श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनी आपली छाप पाडताना मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९ धावांवरच रोहित शर्मा (२) आणि यशस्वी जैस्वाल (१५) या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर उपकर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला.