कोल्हापूर : हिंसाचारानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे. प्रशासनानं यासाठी परवानगी दिली आहे, पण यासाठी काही नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. सध्या ही तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. .Vishalgad Violence : संचारबंदी, स्थानिकांची उपासमार अन्...; हिंसाचाराच्या सहा महिन्यानंतर कशी आहे विशाळगडावरील परिस्थिती? .साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. 31 जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे. पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर तब्बल पाच महिन्यानंतर विलशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार आहे..GDP Growth Rate: भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत! जीडीपी घसरण्याचा सरकारी संस्थेचा अंदाज.सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली होती. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घरं आणि दुकानांची जाळपोळ केली. यात स्थानिक नागरिकांचे मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपतींसह ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेला आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, येथील परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. पर्यटकचं नसल्यानं सहा महिन्यानंतरही विशाळगडावरील व्यवहार ठप्पच होते. गडावर स्थानिकांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश नाकारण्यात आला होता. .शिवरायांनी कोकणातील लोकांना कसा दिला होता रोजगार?.विशाळगडावर नेमकं काय घडलं होतं?जुलै महिन्यात विशाळगडावरील अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हे अतिक्रमण हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी 'चलो विशाळगड' अशी हाक दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते याठिकाणी जमा झाले होते. यावेळी संभाजीराजे आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असताना गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात हिंसाचार सुरु झाला होता. यावेळी अनेक घरांवर दगडफेक झाली. तसेच घरासमोर लावलेल्या दूचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय गडाच्या पायथ्याशी असलेल्या लहान विक्रेत्यांच्या साहित्याची नासधूसही यावेळी करण्यात आली होती. यामध्ये काही पोलीस जखमी झाले होते. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.