Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Mumbai Rain: देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आता आणखी धोकादायक रूप धारण करणार आहे. पुढील ४८ तास अत्यंत संवेदनशील असणार आहेत.
Mumbai Rain

Mumbai Rain

ESakal

Updated on

मुंबईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच दरवर्षी एक ठरलेला प्रसंग पुन्हा घडतो. अंधेरी सबवेपासून ते सायन आणि कुर्ल्यापर्यंत रस्ते पाण्याखाली जातात, वाहने तरंगू लागतात आणि शहराची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन ठप्प होते. चार महिन्यांनी पाणी ओसरते आणि पुढच्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग घडतो. २००५ च्या पुरापासून ते २०२६ पर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात हजारो कोटी रुपये खर्च झाले, असंख्य प्रकल्प उभारले गेले, पण पाऊस आल्यावर मुंबई असहाय्य आणि पाण्याखाली का स्तब्ध उभी राहते?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com