कृषिपंपाच्या बिलासाठी 15 दिवसांची मुदतवाढ 

कृषिपंपाच्या बिलासाठी 15 दिवसांची मुदतवाढ 

मुंबई - राज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आज शासनाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही. 

थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी 30 ऑक्‍टोबरलाच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल. तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडीत केली जाणार नाही. 30 हजार रुपयांपर्यंत मूळ रकमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल मूळ रकमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरित वीजबिल वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. अनधिकृत वीजजोडण्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com