सैनिकांनो, बंदूका मोडा; शिवसेनेची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका 

PM Narendra Modi
PM Narendra Modi

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून खिल्ली उडविण्यात आली आहे. 'काश्‍मीरमधील हिंसाचार आटोक्‍यात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 'गांधी विचार' लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय देशही नि:शब्द झाला असेल' अशा शब्दांत 'सामना'ने या भाषणावर भाष्य केले आहे. 

'ना गोली से, ना गाली से.. समस्या का समाधान होगा काश्‍मिरी लोगों को गले लगाने से' असा विचार पंतप्रधान मोदी यांनी मांडला होता. त्यावर शिवसेनेने अग्रलेखातून टीका केली आहे. 'काश्‍मीरमधील 370 कलम हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडी काश्‍मीरमध्ये जातील आणि तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदूक मोडा आणि काश्‍मिरींना मिठ्या मारा' अशा शब्दांत शिवसेनेने मोदी यांच्या भाषणाचे 'स्वागत' केले. 

'पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात नेहमीचे गुद्दे गायब आणि फक्त मुद्देच मुद्दे असे स्वरूप होते' अशी टीका शिवसेनेने केली आहे. 'देशात हिंसाचार सुरूच आहे व तो श्रद्धा आणि आस्थेच्या नावावर सुरू असेल, तर मुसलमानच काय, हिंदूंनाही असुरक्षित वाटू लागेल. मुसलमानांची धर्मांधता संपवताना इतर अल्पसंख्याक समाजांतील धर्मांधतेचा सैतानही उसळून येणार नाही, हे पाहावे लागेल' असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com