देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे
Updated on

बीड : ""देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गतवर्षी 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरुण बेरोजगार होत आहेत. विदेशात फिरून आणि सूट बदलून देश बदलणार नाही, हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे आहे,'' अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

"एआयएसएफ'चा संविधान बचाव लॉंग मार्च रविवारी बीडला पोचला. त्या निमित्त आशीर्वाद लॉन्समध्ये आयोजित "रोहित ऍक्‍ट परिषदे'त ते बोलत होते.
""शेतमालाला हमीभावाचा वायदा करणाऱ्या पंतप्रधानांनी "पंतप्रधान पीकविमा योजने'चा गाजावाजा केला. प्रत्यक्षात पिकांना नुकसानभरपाई तुटपुंजी मिळाली; मात्र विमा कंपनीला वर्षाकाठी 10 हजार कोटींचा नफा झाला. दुसरीकडे तीन वर्षांत 60 हजार कोटी खर्च करूनही गंगा नदीचे पात्र दूषितच आहे.

हा अनाठायी खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना मदतस्वरूपात दिला गेला असता तर शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात थांबल्या असत्या,'' असे सांगत दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या न्यायासाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी देशातील तरुणांनी मौन सोडून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com