परभणी जिल्ह्यात यंदा मुबलक खत

fertilizers
fertilizers

परभणी- खरिप हंगामासाठी जिल्ह्यात कापसाच्या विविध कंपन्याच्या बियाणांची तीन लाख ५० हजार पाकीटे दाखल झाली असून सोयाबीनचे ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बियाणे टंचाई होणार नसून खतही मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

परभणी जिल्ह्यात खरिप हंगामासाठी पाच लाख २१ हजार ८१० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस, तूर ही पिके महत्वाची आहेत. सोयाबीनचे दाेन लाख आठ हजार ११० हेक्टर तर कापसाचे एक लाख ७० हेक्टर क्षेत्र तर तूरचे ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यंदासाठी सोयाबबनीचे ३५ हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले आहे. कापसाच्या लागवडीसाठी तब्बल तीन लाख ५० हजार पाकीटे जिल्ह्यात आली असून अजून ५० हजार पाकीटे येत्या काही दिवसात येणार आहेत. तर एक लाख ५० हजार मेट्रीक खताची मागणी कृषि विभागाने केली असून ८५ हजार ९०० मेट्रीक टन आवंटन मंजूर झाल्यापैकी ९८ हजार ४७१ मेट्रीक टन उपलब्ध झाला आहे. गतवर्षीचे खत शिल्लक असल्याने यंदा खताची टंचाई नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com