दापोडी परिसरात ऐन सणासुदीच्या काळात पाण्याचा खोळंबा

दापोडी परिसरात ऐन सणासुदीच्या काळात पाण्याचा खोळंबा

दापोडी - परिसरात गेली पंधरादिवसापासुन अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने ऐन सणासुदीच्या काळात दापोडीकर पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. गेली अनेक दिवसांपासुन अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाणी कमी पडत आहे. दापोडीच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दापोडीकर  नागरीकांच्या  पाणी प्रश्नासाठी स्थानिक नगरसेवक प्रतिनिधींनी यापूर्वी आंदोलनेही केलेली आहेत.सध्या गेली पंधरा दिवसांपासुन पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील अनेक भागात पाणी पोचत नाही.येथील गणेशनगर भाग, भाजी मंडई परिसर, हिंदु तेलगु चाळ,सोपान जाधव चाळ,गुलाबनगर आदी भागात पाणी कमी दाबाने येत असल्याने सर्वसामान्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. दापोडी हा पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा असल्याने येथे पुरेसे पाणी पोचत नाही. लोकसंख्येच्या तुलनेत पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेली पंधरादिवसांपासुन एअर लॉक मुळे पाणीपुरवठा विस्कळित झाल्याचे स्थानिक पाणीपुरवठा विभागाकडुन सांगण्यात आले. मात्र पाण्यासाठी होणारी दापोडीकरांची फरफट संपणार कधी असा संतप्त प्रश्न नागरीकांमधुन विचारला जात आहे.

पाणी पुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन-गेली पंधरा दिवस एअर लॉकच्या नावाखाली दापोडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एअर लॉक काढण्यासाठी गेली पंधरा दिवसांपासुन प्रशासन काय करत होते.नागरीकांना याची माहीती का दिली गेली नाही. असा संतप्त सवाल नागरीकांमधुन विचारला जात आहे. पाणी टंचाईमुळे नागरीकांच्या दैनंदिन कामांवर प्रभाव पडला आहे. महिलावर्गास याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपुरे पाणी येत असल्याने घरातील कामे होत नाहीत. पाण्याशिवाय काहीच करता येत नाही.
-पुष्पा गायकवाड हिंदु तेलगु चाळ-नागरीक

गेली पंधरा दिवसांपासुन कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय तर कधी पाणी मिळतच नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो. मंगेश काटे-भाजी मंडई परिसर दापोडीकरांचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी आमची मागणी आहे.
- माई काटे नगरसेविका

प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी पाणीप्रश्नासाठी मागणी केली आहे.यापुर्वीही आंदोलने केली आहेत.येत्या चार दिवसात पाणीपुरवठा व्यवस्थित न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.
- राजु  बनसोडे, नगरसेवक

एअर लॉक कामे स्थानिक पातळीवर करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागास पाण्याचा लागणारा ठराविक कोटयाचा प्रस्ताव आहे.यासंदर्भात सर्वानुमते चर्चा करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवुन पाणी प्रश्नावर उपाय योजना करण्यात येईल. विशाल कांबळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग पालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com