सख्या भावंडांसह तीन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

3 children died by drowning
3 children died by drowning Sakal

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कान्हेगाव परिसरात आदिवासी कुटुंबातील तीन चिमुरड्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. येथील प्रवरा नदीपट्यातील कान्हेगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे कान्हेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

चैतन्य अनिल माळी (वय १० वर्ष), दत्ता आनिल माळी (वय ८ वर्ष) व चैतन्य शाम बर्डे (वय ८ वर्ष) असे त्यांची नावे असल्याची माहिती पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांनी दिली. कान्हेगाव येथील अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात खेळण्यासाठी गेलेले तिन्ही चिमुरडे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही माहिती मिळताच ग्रमस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पहाणी केली. काही वेळानंतर पोलिसांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढुन येथील कामगार रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले. दुपारी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरणीय तपासणी करुन पंचनामा करण्याची कारवाई सुरु होती.

चैतन्य माळी व दत्ता माळी हे दोघे सख्ये भाऊ असून ते चैतन्य बर्डे यांच्यासह आज (सोमवारी) सकाळी शेततळ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते. यापैकी तिघे चिमुरडे कपडे काढुन पाणी खेळण्यासाठी शेततळ्यात उतरले. मात्र पोहता येत नसल्याने तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मयताच्या माळी आणि बर्डे कुटुंबियांसह कान्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

3 children died by drowning
भीमापाणलोट तुडूंब; 'उजनी' काही भरेना..!! शेतकरीवर्ग चिंतेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com