
अहिल्यानगर : गेल्या आठवड्यात जिल्हाभर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आगामी काळात आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अतिवृष्टी, धरणातील विसर्ग आणि नदीपात्रातील अतिक्रमणामुळे जिल्ह्यातील आठ प्रमुख नद्यांवरील २२३ गावे पूरप्रवण होत आहेत. तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत.