Ahmednagar : नागवडे कुटुंबाने राजकारणात कायमच त्यागाची भुमिका घेतली ; अनुराधा नागवडे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे पुत्र पृथ्वीराज व दिग्विजय हेही सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे
जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे sakal

श्रीगोंदे : नागवडे कुटुंबाने राजकारणात कायमच त्यागाची भुमिका घेतली. काहींनी त्याचा गैरफायदाही घेतला. तथापि आमचा प्रामाणिकपणा लोकांना माहिती आहे. त्याची जाणीव लोक ठेवतील. अनेक वर्षांपासून मतदारसंघातील मुलभूत प्रश्नही सुटले नसल्याने माझ्यासाठी नव्हे तर लोकांच्या हितासाठी विधानसभा ताकतीनिशी लढणार, अशी स्पष्ट भूमिका महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी मांडली.

नागवडे कुटूंबाने मतदारसंघात थेट लोकांच्या दारी जात जनसंवाद यात्रा केली. यात अनुराधा नागवडे आघाडीवर होत्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे पुत्र पृथ्वीराज व दिग्विजय हेही सहभागी झाले होते.

‘सकाळ’शी बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या, की सासरे शिवाजीराव बापू नागवडे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले. लोकांचे प्रपंच उभे करताना त्यांनी कधीही स्वहित पाहिले नाही. त्यांचीच शिकवण घेवून आम्ही राजकारण करीत आहोत. आमच्या कुटूंबाने कधीच कोणाला त्रासही दिला नाही आणि कुणाचे राजकारण संपविण्यासाठी डावपेचही आखले नाहीत. तरीही काही राजकारणी आम्हाला टार्गेट करुन ते चांगले आहेत

हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. सगळ्यांना लोक चांगले ओळखून आहेत, आम्ही कुणाला मदत केली, कोण नागवडेंच्या जीवावर मोठे झाले, हे समाजाला माहिती आहे येत्या काळात त्यांना योग्य वेळी, त्याच शब्दात उत्तर मिळणार आहे.

विधानसभा लढणार का ? या प्रश्नावर ‘अर्थात’च लढणार असे स्पष्ट करीत नागवडे म्हणाल्या, आम्ही दोन वेळेला थांबलो. ज्यांच्यासाठी थांबलो त्यांना त्याचे काही वाटत नसले तरी यावेळी मात्र समोर कोण आहे, याची पर्वा होणार नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी मागणार आहोत. आम्ही काँग्रेसचे कट्टर सेवक आहोत. बापुंनी आयुष्यभर कष्ट घेतले. कुणीही काहीही चर्चा करीत असले तरी मी आघाडीच्याच उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे. नेत्यांना काही अडचण असेल तर अपक्ष लढण्याचीही तयारी ठेवणार आहे.

विधानसभा कशासाठी लढायची आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मतदारसंघाचा विकास झाल्याचा देखावा केवळ कागदावर आहे. जे हा दावा करतात त्यांनी एकदा लोकांच्यात जावून सांगितले पाहिजे. रस्ते, वीज, पाणी या समस्याही सोडविता न आलेल्या नेत्यांना आगामी निवडणूकीत उभे राहण्याचाही नैतिक अधिकार नाही.

नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणीही नाही. त्यांच्या सरकार दरबारी असणाऱ्या समस्यांचे निराकरणही होत नाही. लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकतही नसल्याच्या तक्रारी लोक करीत होते. विकास काय असतो व तो कसा करायचा यासाठी आपण ताकतीनिशी विधानसभा लढणार असून सामान्यांचे पाठबळ घेवून यश मिळवू,

तर.... खपवून घेणार नाही- पृथ्वीराज नागवडे

पृथ्वीराज व दिग्विजय नागवडे म्हणाले, मतदारसंघात बापुंनी केलेल्या कामांचे आजही लोक दाखले देतात. त्यावेळच्या कामांचा दर्जा आणि बापुंचे राजकारण याबद्दल आपुलकीने लोक बोलले. काही विघ्नसंतोषी लोक आमच्या कुटूंबाबत चुकीची व दिशाभुल करणारी चर्चा घडवून आणतात.

आमची आई विधानसभा लढणार या चर्चेनेचे काहींनी गलिच्छ राजकारण सुरु आहे. वडील व आई संयमी राजकारणाचे पुरस्कर्ते आहेत, मात्र असे पाठीत खंजीर खुपसणारे राजकारण आम्ही खपवून घेणार नसून जशास तसे उत्तर देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com