KYC
KYCSakal

Ahmednager : बँक खात्यांना नाही ‘आधार’

जिल्ह्यात सव्वा लाख शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार?

अहमदनगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जात आहेत. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी बँकेतील खात्याला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडणे (ई-केवायसी) बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेचे जिल्ह्यात ६ लाख ३७ हजार २५८ लाभार्थी आहेत. त्यापैकी ५ लाख १६ हजार २४९, म्हणजेच ८१ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी जोडणी पूर्ण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सुरवात उत्तर प्रदेशमध्ये केली होती. गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती, बी-बियाणे खरेदी, खते घेण्यासाठी मदत करणे होता. केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते.

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या (कंसात ई-केवायसी) ः नगर ३८ हजार ८९८ (२९ हजार ९९६), नेवासे- ५६ हजार ३०१ (४८ हजार १५३), श्रीगोंदे- ५८ हजार ४१० (४८ हजार ५४), पारनेर- ५९ हजार १४६ (४७ हजार ६०), पाथर्डी- ४७ हजार ५९ (३७ हजार ९११), शेवगाव- ५८ हजार ४९१ (४६ हजार १२६), संगमनेर - ६५ हजार ७२१ (५५ हजार ६३५), अकोले- ३९ हजार ६९२ (२८ हजार ९६३), श्रीरामपूर- २४ हजार १४ (२१ हजार २९०), राहुरी - ४२ हजार ९६१ (३५ हजार ३७७), कर्जत- ५१ हजार ४४६ (४१ हजार ५५३), जामखेड- ३४ हजार ४४ (२६ हजार ६७१), राहाता- २७ हजार ८६३ (२१ हजार ९२), कोपरगाव- ३३ हजार २१२ (२८ हजार ३६८).

तालुकानिहाय ई-केवायसी अपूर्ण शेतकरी संख्या (कंसात टक्केवारी) नगर- ८ हजार९०२ (२२), नेवासे- ८ हजार १४८ (१४), श्रीगोंदे- १० हजार ३५६ (१७), पारनेर- १२ हजार ८६ (२०), पाथर्डी- ९ हजार १४८ (१९), शेवगाव- १२ हजार ३६५ (२१), संगमनेर - १० हजार ८६ (१५), अकोले- १० हजार ७२९ (२७), श्रीरामपूर- २ हजार ७२४ (११), राहुरी - ७ हजार ५८४ (१७), कर्जत- ९ हजार ८९३ (१९), जामखेड- ७ हजार ३७३ (२१), राहाता- ६ हजार ७७१ (२४), कोपरगाव- ४ हजार ८४४ (१४).

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया

पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी केले जाऊ शकते. ई-केवायसी सीएससीवर शेतकऱ्याच्या बोटांच्या ठशाद्वारे पूर्ण केले जाते. यासोबतच सामाईक सेवा केंद्रावर या कामासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. सेवा केंद्रावर ई-केवायसीची फी १५ रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com