
राहुरी : शहरात राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यास २२ दिवस झाले. आरोपींना येत्या ४८ तासांत अटक करावी; अन्यथा लढा मुंबईत नेऊ. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षकांना भेटू. राज्यात लढा उभारू. तपास लागल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.