Ashutosh Kalesakal
अहिल्यानगर
Ashutosh Kale : जनतेची कामे करा; अन्यथा राजीनामा द्या : आशुतोष काळे; जनता दरबारात कामचुकारांना तंबी
Ahilyanagar News : सर्वाधिक समस्या ग्रामसेवक आणि घरकुलांबाबतच्या होत्या. त्याचबरोबर जलजीवन योजनेचे काम रेंगाळले. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक होत नाही. रस्ते धड नाहीत. आदिवासी बांधवांना घरकुल मिळत नाही.
कोपरगाव :अधिकाऱ्यांनी लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नयेत. लोकांची कामे वेळेवर झाली, तर जनता दरबार आयोजित करण्याची गरजच रहाणार नाही. आज येथे येणाऱ्या प्रत्येक अर्ज आणि निवेदनातील काम मार्गी लागले की नाही याची शहानिशा मी स्वतः करणार आहे. अधिकाऱ्यांना जनतेची कामे करता येत नसतील, तर नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीत आयोजित केलेल्या जनता दरबारात कामचुकार अधिकाऱ्यांना दिली.

