
या बाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही.
नगर : राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न चर्चिला जात आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर "छत्रपती संभाजीनगर' नावाचे फलक चिटविले.
अनोखे आंदोलन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर हे नाव होणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत. परंतु, नागरिकांच्या भावनांचा आदर करून "छत्रपती संभाजीनगर' हे नामांतर होणे गरजेचे आहे.
या बाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या गाड्यांवर "छत्रपती संभाजीनगर' नावाचे फलक चिकटविले आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
.....